भारतीय आध्यात्म आणि विज्ञान

वटपौर्णिम
दरवर्षी प्रमाणे मी ही वट पूजनाला गेले होते.. माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळे, वडाला आलेल्या सख्यांनी मला घरीच वड पुजण्याचा  सल्ला दिला….आजकाल म्हणे!!!..वडाच्या डहाळ्या बाजारात विकत मिळतात.. घरातच वड पुजायचा बाहेर कशाला आलात बरे, पाऊस किती आहे, वगैरे वगैरे..!! मी फक्त चेहऱ्यावर हास्य आणुन काहीच प्रतिउत्तर दिले नाही. .. पण घरी आल्यावर मात्र ह्या गोष्टींचा विचार करत राहिले… अय्या,..! खरंच की  इतक्या वर्षात आपण कधीच वडाची फांदी तोडून तीची पूजा केली नाही ….नशिबाने आपल्या ससरी आणि माहेरी मोठमोठाली वडाची झाडे आहेत… त्यामुळे वडाची फांदी आणून पूजनाचा कधी प्रश्नचं आला नाही… पण वटपौर्णिमा काळात वडाचे असे राजरोषपणे  हातपाय  तुटतात आणि विक्री होतात!!!… या विक्रीत आपण तरी गिर्‍हाईक नाही आहोत, याचा अभिमान वाटला … वर पाहून देवाचे आभार मानलेत पण,… मनात प्रश्न राहिलाच की…  त्यांचं काय??  ज्यांना शहरांमध्ये असे मोठमोठाले वड मिळत नाहीत पूजनाला….
    मुंबईत वडाची झाड तशी, खूपच दुर्मिळ…ट्रेन किंवा बस, टॅक्सीमधून येता-जाताना जुन्या बिल्डिगां वरती पक्ष्यांच्या विष्टेतून उगवलेली असंख्य इवलुशी  वड वजा इतरही रोपे पाहिली आहेत मी… त्यांना पाहतांना सुद्धा  मन कसं चमणी एवढं होत, यांची मूळ खोल जात असल्यामुळे बिल्डींगवाल्यांना तशी धोकादायकच म्हणून ते ही त्यांना सुसाट तोडत जतात…

2
   आम्हा कोकणकरांची, मोठमोठाले वटवृक्ष मातीच्या कुशीत आपल्या मोकळ्या जटा सोडवण्यास देऊन किमान गुंटाभर जागेत सहज हात पाय मोकळे करून एखाद्या शंभरीतल्या आजोबांसारखे पहुडलेले वृक्ष…पाहाण्याची  रोजचीच नजर… या  बिचाऱ्या सनकडी सारख्या, जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या झाडांना पाहुन, त्यांची खूप दया येते… वृक्षारोपण निमित्ताने नर्सरीमधून विदेशी रोप खरेदी करण्यापेक्षा हीच  सर्व रोपे काढून घ्यावीत आणि एखाद्या मोकळ्या जागेत नेऊन लावावीत असे खूपदा वाटते…भविष्यात किमान वटवृक्ष पूजनाला वड तरी मिळतील … जरी वटपौर्णिमा पूजन ऐका दिवसासाठी असले तरी, वड राहिले आहेत कुठे?? नवीन पिढीने पुढे , वड पुजायचा कसा???… भिंतीवर चढुन की त्यांच्या माना तोडून. ..?? ,
   फांदी तोडुन व्रत पूर्ण करणयास माझा काही विरोध वगैरे नाही!!!…  पण ती फांदी भविष्यात जगवलीत तर खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी होईल नाही का…!!!
पुराणात सांगितल्या प्रमाणे… एके दिवशी, सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास गेला असता वडाच्या झाडावरून पाय घसरून  खाली पडला आणि मृत झाला, त्याचे प्राण यमदेवांनी मृत्यूलोकात नेलेत आणि  मोठ्या प्रयत्नाने त्याची पत्नी सावित्रीबाईने, ते प्राण यमदेवांकडून परत मिळविलेत… आणि सत्यवान जीवंत झाला,… सावित्रबाईंनी पुढे साता जन्मांच्या लग्नबंधनाचा वर (आशीर्वाद) यमदेवांकडून मागितला… हा सर्व प्रकार ज्या ठिकाणी घडला, … 
3
ते होते वडाचे झाड …ज्या झाडावरून पडुन सत्यवान गतप्राण झाला होता…. तेव्हापासून वटपूजनाचे व्रत  उदयास आले…
  आजच्या सायन्स नुसार पहायला गेलो तर, वटवृक्षचं काय वटवृक्ष कुळाच्या वृक्षांचे महत्व खूप आहे, जसे की वड, उंबर, पिंपळ, प्लक्ष…. हे  वृक्ष सर्वात जास्त ऑक्सिजनचे प्रमाण देणारे वृक्ष आहेत आणि त्यांच्या- त्यांच्या अनेक कहाण्या देखील आहेत… जेणे करून हे वृक्ष सहज वाचवले गेलेत आणि निसर्गाचा व मानवाचा उद्धार झाला… आजच्या पिढीला ह्या कहाण्या जरी भाकड कथा वाटल्या तरी… आजच्या आधुनिक शास्त्रात सुद्धा हे आपल्या पूर्वजांचे शास्त्र लपलेले नाही…. ज्यांनी या वृक्षांचे महत्त्व जाणले ते आपले खरे सायंटिस्ट होते, म्हणजे आपले “ऋषीमुनी” !!!…. ज्यांनी, आपल्या लोकांना वृक्षांचे महत्त्व व्रतवैकल्याच्या  माध्यमातून समजावून सांगितले ते आपल्या देवभोळ्या लोकांना  चटकन पटले …. मग असे वृक्ष वाचवणे त्या काळात सोपे जाऊ लागले ….पुढे पिढ्यानपिढ्या पूजनाची हीच कृती आपण करत आलो आहोत…. यामागचे सायन्स माहीती नसले  तरी समस्त मानव जातीला आणि निसर्गालाही  जगणं सोपं झालं….  मग आता सांगा वड जगवायला नको का…!!!
    काहीजणी या सणाला अंधश्रद्धा म्हणून सहज बाजूला सारतात…. आमच्या एक योग टीचर आहेत …… काही वर्षांपूर्वी त्यांच्या वाचनात एक आर्टिकल आलं होतं.. .

4
त्या आर्टिकल मध्ये वटवृक्ष पूजनाच्या काही सायंटिफिक गोष्टी छापुन  आल्या होत्या… त्या अशा की,.. वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसांचे असते, या काळात स्त्रियांनी आपला जास्तीत जास्त वेळ वटवृक्षाखाली घालवावा, कारण वटवृक्षातुन आणि त्याच्या पारंब्यातुन काही ठराविक वेळेला  विशिष्ट असे थेंब पाझरत असतात जे स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला अतिशय हितकारक असतात…त्यामुळे स्त्रियांनी आपला जास्तीतजास्त वेळ या वृक्षाच्या संपर्कात घालवला तर त्यांच्या आरोग्याला  लाभ होऊ शकतो…. म्हणून पूर्वीच्या स्त्रीया झिम्मा फुगड्या खेळत वडाच्या जास्त संपर्कात रहात….
     ज्या वृक्षामुळे आपल्या  साता जन्माच्या गाठी बांधल्या जाणार आहेत,  त्याच वृक्षाच्या माना मोडून आपण पुढच्या सात पिढ्यांचा नाश करत आहोत,…ही लक्षात घेण्यासारखी  बाब आहे!!… इतके जरी आपल्याला कळले, तरी आपली वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली असे म्हणण्यास हरकत नाही…
   तेव्हा,… कृपया कुंडीत पुजलेला वड जगवला आणि मोकळ्या जागेत किंवा तुमच्या गावी नेऊन लावला  तर यासारखे उत्तम पूजन नाही…. बघा पटलं तर घ्या..!!
🙏🙏🙏

धन्यवाद
सौ. गौरी विशाल बांदिवडेकर

@gauurivishal

g